गगनामधल्या सात ऋषींना
एक पहाटे विचारलें मी
तुमचा माझा प्रवास चाले
तिमिराने भरलेल्या व्योमीं
या मातीचें
मजला बंधन
तुम्ही नभांतिल
मुनी सनातन
या फिरण्याचा हेतु तुम्हांला
काय गवसला?
एक ऋषी मुख वळवुनि मागे
खिन्न स्वराने मला म्हणाला,
हेतु कळता, प्रवास तर हा
कधीच असता समाप्त झाला_
जन्म जाहला
गतींत आमुचा
अंतही आहे
गतींत आमुचा
हेतुहीन या गतींत आहे
तुमचा आमुचा प्रपंच सारा
गुरफटलेला.
Thursday, April 26, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment